rahul gandhi
sakal
नवी दिल्ली - ‘अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र सरकारने भारत मातेला विकले असून, देशाची ऊर्जा सुरक्षा अन् शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करत पूर्ण शरणागती पत्करली आहे. भारताचा डेटा आता अन्य देशांच्या हाती गेला आहे,’ अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये भाग घेताना केली. एपस्टीन फाइल्सचा मुद्दाही त्यांनी या वेळी मांडला. राहुल यांच्या आरोपांचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खंडन केले आहे.