

मोस्ट वान्टेड गुन्हेगारा पकडण्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला केला यात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे घटना घडली आहे. अररियामध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये फुलकाहा पोलीस ठाण्यात तैनात एएसआय राजीव रंजन पोलीस पथकासह फुलकाहा मार्केटमध्ये छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यांचा गावकऱ्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मात्र वॉन्टेड गुन्हेगार मात्र फरार झाला.