Bilkis Bano Case: आरोपींच्या सुटकेनंतर भीतीने मुस्लिमांनी गाव सोडलं; म्हणाले...

Bilkis Bano Case
Bilkis Bano CaseSakal

बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना गुजरात सरकारने माफी धोरणांतर्गत मुक्त केलं. त्यावरुन सध्या देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रंधिकपूर गावातील मुस्लिमांनी आपला जीव वाचवण्यासाठी आपलं गाव सोडलं आहे. तसंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. (Bilkis Bano Case)

Bilkis Bano Case
Bilkis Bano: बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला बजावली नोटीस

बिल्किस बानो प्रकरणातल्या ११ आरोपींच्या मुक्ततेनंतर रंधिकपूर गावातले मुस्लीम नागरिक गाव सोडून देवगड बारिया इथल्या रहिमाबाद कॉलनीमध्ये स्थलांतरित झाले. रहिमाबाद कॉलनी जमियतने २००२ च्या गुजरात दंगलीतील पीडितांसाठी बांधली होती. स्थलांतरीतांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी करण्यात आली. तसंच या स्थलांतरितांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानंतर आपण गावी परतू, असंही या नागरिकांनी सांगितलं आहे.

Bilkis Bano Case
Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान

दहोडच्या जिल्हाधिकाऱ्यांना इथल्या ग्रामस्थांनी पत्र दिलं आहे. या पत्रावर ५५ नागरिकांनी सह्या केल्या आहेत. जोवर या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकलं जाणार नाही, तोवर आपण गावात परत येणार नाही, असं या नागरिकांनी सांगितलं आहे. बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या घरच्यांची गुजरात दंगलीच्या वेळी २००२ साली हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून बिल्किस बानो या कायदेशीर लढाई लढत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com