अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण : प्रियांका गांधी

अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज सरकारवर पुन्हा एकदा कठोर शब्दांत टीका केली. एखादी खोटी गोष्ट शंभरवेळा सांगितली म्हणून ते काही सत्य ठरत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचे वातावरण आहे. हे भाजपने मान्य करत त्यावर उपाय देखील शोधायला हवेत. मंदीमुळे ओढावलेली स्थिती सर्वांसमोर असून, सरकार आणखी कितीकाळ हेडलाईन मॅनेजमेंटच्या माध्यमातून काम चालविणार आहे, असा सवालही त्यांनी ट्‌विटच्या माध्यमातून केला आहे. 

"जीडीपीचा विकासदर पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की, अच्छे दिनची टिमकी वाजविणाऱ्या भाजपने अर्थव्यवस्थेला पंक्‍चर केले आहे, ना जीडीपी वाढतोय ना रूपया मजबूत होतो आहे. रोजगार तर पूर्णपणे गायबच झाले आहेत. अर्थव्यवस्थाच नष्ट करण्याचे हे कृत्य कोणी केले हे तरी सरकारने आता जाहीर करावे,'' अशी टीका त्यांनी दुसऱ्या ट्‌विटमधून केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच मुद्यावरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी देखील सरकारवर निशाणा साधला होता. या मंदीच्या वातावरणास नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराची (जीएसटी) घाईघाईत झालेली अमलबजावणी हे दोन्ही घटक कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com