BJP Vs Congress : कपटी राजकारणातून आरोप; कथित मतचोरीसंदर्भात भाजपकडून राहुल यांच्यावर टीका

Election Politics : भाजपने राहुल गांधींच्या मतचोरी आरोपांना राजकीय स्टंट ठरवून टीका केली असून, बिहारच्या मतदार यादीवर काँग्रेसकडून कोणतीही तक्रार नसल्यानं आरोपांचा धज्जी उडवला आहे.
BJP Vs Congress

BJP Vs Congress

Sakal

Updated on

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा मतचोरीचा आरोप म्हणजे कपटी राजकारण असल्याची टीका भाजपकडून बुधवारी करण्यात आली. बिहारची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. मात्र मतदारयादीत नाव सामील होण्याच्या अथवा हटविण्याच्या दृष्टीने काँग्रेसने एकही तक्रार केली नाही. यावरुन मतचोरीचा त्या पक्षाचा आरोप म्हणजे राजकीय स्टंट असल्याचे सिद्ध होते, असे भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com