कोलकता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला. याचा आढावा पक्षाने घेतला असता कागदावर बूथ समित्या असूनही निवडणूक प्रतिनिधी नसल्यामुळे भाजपची कामगिरी खराब झाल्याचे सांगण्यात आले.
निवडणूक काळात राज्यातील सुमारे ८० हजार बूथपैकी ७० टक्के ठिकाणी निवडणूक प्रतिनिधी नव्हते. काही बूथवर लोकांना पैसे देऊन प्रतिनिधी नेमावे लागले होते. भाजपच्या सूत्रांच्या मते या संघटनात्मक कमकुवतपणामुळे खराब कामगिरी झाली. केंद्रीय भाजपने जेव्हा जेव्हा बूथ समित्यांचा तपशील मागितला तेव्हा काही बदल करून हेच कारण सांगितले गेले आहे. प्रचारनिधीचा गैरवापर झाल्याचा आरोपही झाला आहे.
भाजपच्या कृष्णनगरमधील उमेदवार अमृता रे आणि बशीरहाटच्या उमेदवार रेखा पात्रा या दोघांनीही निवडणूक प्रचारासाठी निधीचा गैरवापर केल्याचा जाहीर आरोप केला होता. प्रचारासाठी वाटप केलेला संपूर्ण निधी मंडल अध्यक्षांकडून मिळाला नसल्याची तक्रार काही बूथ अध्यक्षांनी केली आहे. भाजपच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे म्हणजे जुने कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले. तसेच घरोघरी जाऊन प्रचार करण्यात पक्ष कमी पडला, असेही सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.