बिहारमध्ये बांधकामाधीन असलेल्या एका पुलाचा काही भाग २९ एप्रिल रोजी कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेचं कारण विचारलं असता IAS अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तराने नितीन गडकरी (Nitin Gadkari) अवाकच झाले. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगितला आहे.
नितीन गडकरी म्हणाले, "२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला. मी माझ्या सचिवाला या दुर्घटनेचं कारण विचारलं. तेव्हा त्याने मला सांगितलं की जोराचा वारा सुटल्याने पूल कोसळला. मला एक समजत नाही, हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच."
१७१० कोटी खर्चून उभारला जात असलेला पूल जोराचा वारा सहन करू शकत नसेल तर हा चौकशीचा विषय असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. ३११६ मीटर लांबीच्या या पुलाचं काम २०१४ मध्ये सुरू झालं होतं. २०१९ मध्ये ते पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही हे काम सुरूच आहे. सुलतानगंजचे आमदार ललित नारायण मंडल यांनी याआधी मुख्यमंत्र्यांनी पूल दुर्घटना प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.