
धावत्या बसला आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना लखनऊत घडलीय. बसला आग लागताच चालक आणि वाहकाने उडी मारली. त्यानंतर बस जवळपास एक किलोमीटरपर्यंत धावत होती. बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत असल्यानं आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. जेव्हा कळालं तेव्हा खूप उशीर झाला होता. या घटनेत ३ मुलांसह एक महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सर्वजण बिहारचे असून ते दिल्लीला निघाले होते.