
मेडिकल सायन्स सध्या इतकं अद्ययावत झालंय की काही असाध्य आजारांवर उपचारही आता शक्य झाले आहेत. तर काही आजारांचं समूळ उच्चाटन करण्यापर्यंत मेडिकल सायन्सने यश मिळवलंय. सध्या एका विद्यार्थ्यानं केलेल्या दाव्याची चर्चा सर्वत्र होत आहे. बुडापेस्टमधील एका मेडिकलच्या विद्यार्थ्यानं कॅन्सर, अंधत्व, अर्धांगवायू सारखे आजार २०३० पर्यंत नाहीसे होतील असा दावा केलाय. अॅडव्हान्सड लसी, आधुनिक उपचारपद्धती आणि तंत्रज्ञानाची मदत शास्त्रज्ञ घेत आहेत असंही म्हटलंय.