CBSE Rechecking Controversy
esakal
सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या उत्तरपत्रिका त्यांच्या नसल्याचा गंभीर दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेदांत नावाच्या विद्यार्थ्याने हा आरोप केल्यानंतर आता संजना नावाच्या विद्यार्थिनीनेही अशाच प्रकारचा दावा केला आहे. तिला देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेचे पहिले पान तिचे असले, तरी उर्वरित पाने तिची नसल्याचे ती म्हणाली. यामुळे सीबीएसईच्या कारभारातील गोंधळ समोर आला असून, सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, सीबीएसईच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.