

Indian ships insurance
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारने सार्वभौम सागरी निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली. भारतीय ध्वज असलेल्या भारताकडे येणाऱ्या आणि भारताशी संबंधित जहाजांना विमा संरक्षण प्रदान करणे, वाढत्या जागतिक जोखमींपासून देशाच्या व्यापाराचे संरक्षण सुनिश्चित करणे आणि परदेशी विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करणे, हा याचा उद्देश आहे.