
नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांमध्ये (2018 -21) एकूण 64 प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएच्या (NIA) टीमला देण्यात आल्याची माहिती केंद्राने मंगळवारी (Central Government IN Loksabha) लोकसभेत दिली. गेल्या काही वर्षांत किती गुन्हे दाखल झाले आणि आरोपींच्या किती मालमत्ता जप्त केल्या? या मुद्द्यावर लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारने वरील उत्तर देण्यात आले आहे.
दरम्यान, चौकशीसाठी देण्यात आलेली ही प्रकरणे देशविरोधी कारवाया करण्यात सहभागी असलेल्या अशा दहशतवादी आणि संघटनांविरुद्ध होती. या प्रकरणांमध्ये जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, ईशान्य राज्ये, पश्चिम बंगाल, झारखंड आणि इतर राज्यांशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत, ज्यांचा तपास सुरू आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, या वर्षांमध्ये एनआयएकडे सोपविण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या पुढीलप्रमाणे आहे...
1) 2018 मध्ये 18 गुन्हे दाखल.
2) 2019 मध्ये 14 गुन्हे दाखल.
3) 2020 मध्ये 23 गुन्हे दाखल.
4) 2021 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 09 गुन्हे दाखल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.