

Aravalli Case
ESakal
अरावली पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अरावली प्रदेशात नवीन खाण भाडेपट्टे देण्यावर स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. वन आणि पर्यावरण मंत्रालयाने राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, नवीन मार्गदर्शक तत्त्वे विकसित होईपर्यंत कोणतेही नवीन खाण भाडेपट्टे देऊ नयेत.