

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्तावाढीची खुशखबर दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयानुसार महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होणार आहे. याचा फायदा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांनाही मिळणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.