नवी दिल्ली - न्यायालयाने प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, न्यायालयासाठी कोणतेही प्रकरण लहान-मोठे नसून प्रत्येक प्रकरण महत्त्वाचे असते, असे मत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी व्यक्त केले. (chief justice of india said that no case is big or small for the court)
चंद्रचूड पुढं म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात शेकडो प्रकरणे आहेत आणि त्यांचा जलद निपटारा व्हावा यासाठी न्यायाधीश आणि रजिस्ट्री कर्मचारी कठोर परिश्रम घेतात.
न्यायमूर्ती म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या तीन महिन्यांत १२,४७१ खटले निकाली काढले. "कोर्टासाठी खटला मोठा किंवा छोटा नसतो - प्रत्येक प्रकरण महत्वाचे असते. २३ मार्च २०२० ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ३.३७ लाख लाख प्रकरणांची सुनावणी केली. सुनावणीच्या 'हायब्रीड मोड'साठी आम्ही तांत्रिक पायाभूत सुविधांचा वापर करत आहोत, ज्यामुळे देशाच्या कोणत्याही भागातील पक्षकारांना न्यायालयीन कामकाजात सहभागी होता येईल, असे ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.