आसामला संघाचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

गुवाहाटी : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना आम्ही आसाममधील इतिहास, भाषा, संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसाम नागपूरमधून चालू शकत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचा आज स्थापना दिन असून, देशभरात मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शहरांत याचे आयोजन करण्यात आले, यानिमित्त राहुल गांधी गुवाहाटीतील मार्चमध्ये सहभागी झाले होते. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील आणि प्रियांका गांधी लखनौमधील मार्चमध्ये सहभागी झाले होते.

राहुल गांधी म्हणाले, की आसामला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत. आसामला फक्त आसाममधील जनताच चालवेल. भाजप ज्याठिकाणी जात आहे, तेथे द्वेषाचे राजकारण करत आहे. आसामसह विविध राज्यांतील युवा आंदोलन करत आहेत. भाजप त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com