
प्रयागराज : ‘‘देशावर आलेल्या कोणत्याही संकटामध्ये तो केवळ राज्यघटनेमुळेच एकत्रित आणि मजबूत राहिला आहे,’’ असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. ‘‘देशाची एकसंधता कायम राहण्याचे संपूर्ण श्रेय राज्यघटनेला जाते,’’ असेही गवई म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिलांच्या चेंबरच्या आणि बहुमजली पार्किंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनावेळी गवई बोलत होते.