AI Impact Summit
sakal
नवी दिल्ली - ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केवळ प्रदर्शनांपुरता न राहता तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था व गुंतवणूकदारांशी सहकार्य करण्यास महाराष्ट्र तयार आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेत केले. ‘कृषिक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता.