
मत चोरीच्या मुद्द्यावर आंदोलन करीत असलेल्या विरोधी पक्षाच्या असंख्य खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशा गोंधळाच्या स्थितीत विधेयके मंजूर करून घेणे हा लोकशाहीचा विश्वासघात असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत बोलताना केली.