उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींना अटक, काँग्रेसचा दावा

उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींना अटक, काँग्रेसचा दावा

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागात मोठा हिंसाचार उफळला असून, यामध्ये आठ शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे उत्तर प्रदेशचं राजकारण ढवळून निघालं असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी लखीपूरला पोहचल्या आहेत. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोमवारी पहाटे प्रियंका गांधी लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागाकडे निघाल्या होत्या. यावेळी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले असून ताब्यात घेतलं आहे.

लखीमपुर खीरी येथे जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना हरगांव येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना सेकंड बटालियन गेस्ट हाऊस येथे नेण्यात आलं. दुसरीकडे युथ काँग्रेस अध्यक्ष बी. श्रीनिवास यांनी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला आहे. श्रीनिवास यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडून अद्याप याबाबत कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसनेही प्रियंका गांधी यांना अटक केल्याचं ट्विट केलं आहे. प्रियंका गांधी यांना हरगांव येथून अटक करण्यात आली असून त्यांना सीतापुर पोलिस लाइन येथे नेण्यात आलं आहे. कृपया सर्वजण तिथे पोहचा, असं ट्विट उत्तर प्रदेश काँग्रेसने केलं आहे. श्रीनिवास यांनीही आपल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांना अटक केल्याचा दावा केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “शेवटी तेच झालं. जे भाजपला अपेक्षित होतं. महात्मा गांधींच्या लोकशाही देशामध्ये गोडसे समर्थकांनी भर पावसामध्ये आणि पोलीस दलाच्या तुकड्यांना तोंड देत अन्नदाता शेतकऱ्याला भेटण्यासाठी पोहचलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगावमध्ये अटक केली. ही केवळ लढाईची सुरुवात आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो,”

प्रियंका गांधी काय म्हणाल्या?

खूप महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहे तरीही सरकार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. सुरवातीपासून शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांना संपून टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज दाबण्याच राजकारण करत आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. हा देश भाजपच्या विचारधारेवर चालणारा देश नाही. या देशाला शेतकऱ्यांनी बनवल आहे. प्रियंका गांधी पुढे म्हणाले की जेव्हा सरकार आणि पोलीस शक्तीचा वापर करत असते तेव्हा त्यांची नैतिकता संपलेली असते. मी माझ्या घरातून बाहेर पडून कोणताही अपराध करणार नाही. मी फक्त मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात आहे.

देशभर आज निदर्शने

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com