Jairam Ramesh : कॉंग्रेस रामचे पुजारी तर भाजप रामचे व्यापारी; जयराम रमेश

पाच न्यायांवर काँग्रेसचे काम
Jairam Ramesh
Jairam Rameshesakal

नंदुरबार : ‘‘काँग्रेस पक्ष पाच न्यायांवर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना आधार, सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. ही एका व्यक्तीची गॅरंटी नसून संपूर्ण काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे. त्यासाठीच खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू आहे. काँग्रेस पक्ष रामाचा पुजारी, तर भाजप रामाचा व्यापारी आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केली.

Jairam Ramesh
Health Care News : हृदय निरोगी ठेवायचं असेल तर, सकाळी 'या' पेयांनी दिवसाची सुरुवात करा

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेने गुजरातमधून मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. त्याचा प्रारंभ नंदुरबार येथून झाला. कार्यक्रमापूर्वी काँग्रेसचे केंद्रीय तसेच राज्यस्तरीय नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयराम रमेश म्हणाले, ‘‘ केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे धनदांडग्या उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. तत्कालीन मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते; परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सध्याचे सरकार तयार नाही.

‘‘भाजप हे ‘वॉशिंग मशिन’ आहे. त्यामुळे कोणीही प्रवेश केला की तेथे स्वच्छ होतात. ज्यांना आदर्श नाही ते पक्ष सोडून गेल्याने फरक पडत नाही. उलट असे लोक गेल्याने नवीन शेकडो कार्यकर्ते जोडले जातात. त्यांना नेतृत्वाची संधी मिळते. कोणी एकाने पक्ष सोडला तर नवीन लोकांसाठी दारे, खिडक्या उघडतात,’’ असे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे रमेश चेन्निथला, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com