
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात जागतिक स्तरावर संदेश देण्यासाठी जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून विचलीत करण्याचा प्रयत्न आहे, अशी खिल्ली उडवली. तसेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.