Rahul Gandhi : काँग्रेस चेंज नव्हे, तर एक्सचेंज होतेय, राहुल गांधींनी आता...; ‘आप’ची टीका

Rahul gandhi and Bhagwant mann
Rahul gandhi and Bhagwant mann

मुंबई – मागील काही दिवसांपासून काँग्रेसची सातत्याने पिछेहाट होत आहे. मात्र आम आदमी पक्ष मजल दरमजल करत अनेक राज्यांमध्ये आपले पाय पसरत आहे. त्यातच आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील आपल्या सरकारच्या कामगिरीची माहिती देताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. (Rahul Gandhi news in Marathi)

Rahul gandhi and Bhagwant mann
'सर्वोच्च’स्थानीही न्याय मिळणार नसेल, तर मग...'; बिल्किस प्रकरणावर DCW प्रमुख बोलल्या

गुजरातमधील पराभवानंतर राहुल गांधी म्हणाले होते की, गुजरातेत आप आले नसते तर त्यांनी भाजपचा पराभव केला असता. यावर भगवंत मान म्हणाले की राहुल गांधी यांनी किती वेळा गुजरात दौरा केला आहे. पश्चिमेकडे निवडणूक असताना राहुल गांधी पुर्वेकडे पदयात्रा करत होते. त्यामुळे राहुल यांनी आधी त्यांच्या टायमिंगमध्ये सुधारणा करून घ्यावी.

भगवंत मान पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशातील जनतेने काँग्रेसला निवडून दिले. पण आज तिथे भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात कोणाचे सरकार होते? मात्र आज भाजप सत्तेच्या खुर्चीवर बसले आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवलीच नाही. काँग्रेस हा आता चेंज नाही, तर एक्सचेंज पक्ष बनलाय. काँग्रेस कोमात गेली असून गरीब झाली आहे, त्यामुळे त्यांना आमदार विकून उदरनिर्वाह करावा लागत असल्याची जहरी टीका मान यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com