दुसऱ्या लाटेपक्षाही कोरोनाची तिसरी लाट अधिक भयावह असेल : SBI

दोन ते तीन टक्के मुलांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ शकते. मुलांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच आरोग्य मंत्रालय मुलांसाठीच्या औषधांबाबतही विचार करत आहे.
corona
coronaSakal Media
Summary

दोन ते तीन टक्के मुलांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ शकते. मुलांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच आरोग्य मंत्रालय मुलांसाठीच्या औषधांबाबतही विचार करत आहे.

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट भारतात घातक ठरली, मात्र त्यानंतर तिसरी लाटही येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने एक अहवाल सादर केला आहे, त्यात म्हटले आहे की, तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेसारखी प्राणघातक ठरू शकते. तिसऱ्या लाटेचा परिणाम सुमारे ९८ दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो.

जगभरातील देशांना आलेल्या अनुभवांचा संदर्भ देत एसबीआयच्या इकोरॅप अहवालात म्हटले आहे की, चांगल्या तयारीद्वारे महामारीमुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण कमी होऊ शकते. इतर मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सरासरी १०८ दिवसांपर्यंत राहिली होती, तर तिसरी लाट ९८ दिवसांपर्यंत राहू शकते.

corona
नवे IT नियम सर्च इंजिनवर लागू होत नाहीत; गुगलची कोर्टात धाव

तिसऱ्या लाटेसाठीची तयारी

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याची दिसत असून देशभरात तिसऱ्या लाटेला रोखण्याची तयारी सुरू आहे. यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय उपकरणांची खरेदीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआयने अहवाल सादर केला आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव किती होता हे जाणून घेण्यासाठी एका महिन्याची आकडेवारी पुरेशी आहे. मे महिन्यात ९०.३ लाख नवे कोरोनाग्रस्त नागरिक आढळून आले होते. पण गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेश या कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झालेल्या राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे.

corona
महाराष्ट्राची 'लेडी सिंघम' मेहुल चोक्सीला आणणार भारतात!

नवीन मार्गदर्शक तत्वे

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के.पॉल म्हणाले की, कोरोना व्हायरसचे स्वरुप बदलले तर त्याचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन टक्के मुलांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ शकते. मुलांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच आरोग्य मंत्रालय मुलांसाठीच्या औषधांबाबतही विचार करत आहे. यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन मार्गदर्शक तत्वे लवकरच प्रसिद्ध केली जाऊ शकतात.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com