गुवाहाटीत संचारबंदी शिथील; दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा  

Curfew relaxed from 9am to 4pm in Guwahati,
Curfew relaxed from 9am to 4pm in Guwahati,

गुवाहाटी : नागरिकत्व कायद्यावरून आसामसह ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला असून, आज (शनिवार) आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये काहीकाळासाठी संचारबंदी उठविण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तूंसाठी नागरिकांच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

या विधेयकाला विरोधाचे याचे लोण आता पश्‍चिम बंगालमध्ये पोचले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणांवर हिंसक आंदोलने झाली. शुक्रवारी आसाममधील दिब्रुगड आणि मेघालयातील शिलॉंगमध्ये आज काही काळासाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती. आसाममधील उल्फा या बंडखोरांच्या संघटनेतील चर्चेचे समर्थन करणाऱ्या गटाचे नेते अरविंद राजखोवा यांनी या विधेयकामुळे आसाम नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. 

दरम्यान, संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यामध्ये रूपांतर झाले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर नागालॅंडमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी वस्तूंचा साठा करण्यास सुरवात केली आहे. आज नागालॅंडची राजधानी कोहिमासह दिमापूर येथील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तशीच परिस्थिती ईशान्येकडील अन्य राज्यांमध्येही पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com