Cyclone Sitrang: महाराष्ट्रातही 'सीतरंग' थैमान घालणार? हवामान विभागाने दिली माहिती

Cyclone Sitrang
Cyclone Sitrang

सितरंग चक्रीवादळामुळे आसाममधील परिस्थिती चिंताजनक आहे. येथे सुमारे 83 गावांतील 1100 हून अधिक लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.(Cyclone Sitrang prevail in maharashtra IMD)

बांगलादेशात बहुतेक राज्यात वादळाच्या हाहाकाराने लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान सीतरंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आतापर्यंत 1146 लोक प्रभावित झाले आहेत.

चक्रीवादळ सीतरंगने बांगलादेशमध्ये किमान 35 जणांचा बळी घेतला आहे. तर सुमारे 8 दशलक्ष लोकांच्या घरातून वीज गेली आहे. बांगलादेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे सुमारे 10 हजार घरांचे नुकसान झाले आणि 6 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिके नष्ट झाली. हजारो मासेमारी प्रकल्पही वाहून गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com