Mamata Banerjee: दामोदर खोऱ्यातून पाणी सोडल्याने पूर; ममता बॅनर्जी यांचा आरोप, पीडितांना प्रत्येकी पाच लाख रुपये देणार

Damoda rValley Flood: उत्तर बंगालमधील महापूर मानवनिर्मित असून यास दामोदर खोरे महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. दामोदर प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागातील अनेक नद्या तुडुंब भरून वाहू लागल्याचे म्हटले आहे.
Mamata Banerjee

Mamata Banerjee

sakal

Updated on

कोलकता : उत्तर बंगालमधील महापूर मानवनिर्मित असून यास दामोदर खोरे महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. दामोदर प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागातील अनेक नद्या तुडुंब भरून वाहू लागल्याचे म्हटले आहे. पूर आणि भूस्खलनात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि कुटुंबातील एका सदस्याला गृहरक्षक दलात नोकरी देण्यात येईल, असे आश्‍वासन बॅनर्जी यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com