देशभर आणीबाणी लागू करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचाच - राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली - ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभर आणीबाणी लागू करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचाच होता. देशात आणीबाणीच्या काळामध्ये जे काही घडले तेही चुकीचेच होते पण सध्या देशामध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे त्यापेक्षा तेव्हाची स्थिती ही पूर्णपणे वेगळी होती. काँग्रेसने या देशाची संघटनात्मक चौकट काबीज करण्याचा प्रयत्न कधीच केला नव्हता.’ असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज केले.

अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातील प्राध्यापक आणि देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांच्याशी संवाद साधताना राहुल यांनी उपरोक्त मत मांडले. आपण नेहमीच काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने लढा दिला. या देशाला राज्यघटना दिली आणि समतेचा देखील पुरस्कार केला, असे राहुल यांनी स्पष्ट केले. यावेळी बसू यांनी राहुल गांधींना आणीबाणीबाबत विचारले असता ते म्हणाले की,‘‘ माझ्या मते ती एक चूकच होती आणि माझ्या आजीने देखील ती बाब अनेकदा मान्य केली आहे. आता देशामध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे त्यापेक्षा तेव्हाची स्थिती वेगळी होती.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संघ त्यांची माणसे नेमतोय
काँग्रेसने या देशाच्या संघटनात्मक चौकटीला कधीच धक्का लावला नाही. आमच्या पक्षाची रचनाच त्याला मान्यता देत नाही, आम्ही मनात आणले तरी देखील ते करू शकत नाही, असेही राहुल यांनी यावेळी स्पष्ट केले. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे वेगळ्या गोष्टी करतो आहे. महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांच्या विचारांची लोकं नेमली जात आहेत. भविष्यामध्ये आम्ही भाजपला पराभूत केले तरीसुद्धा आम्ही त्यांच्या विचारांच्या लोकांना या संस्थांमधून काढणार नाही, असेही राहुल यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले..

  • केंद्र सरकार लोकशाही व्यवस्थेचे नुकसान करत आहे. 
  • घटनात्मक संस्था नष्ट केल्या जात आहेत.
  • प्रत्येक ठिकाणी आर.एस.एस. घुसखोरी करत आहेत. न्यायालय, निवडणूक आयोग अशा स्वतंत्र संस्थांवर एकाच विचारसरणीचा प्रभाव आहे
  • संसदेत चर्चेच्यावेळी ‘माइक’ बंद केला जातो. आम्हाला बोलू दिले जात नाही.
  • पक्षांतर्गत लोकशाहीबद्दल बोलणारा मी पहिला होतो. परंतु, इतर पक्षांबद्दल असा प्रश्न विचारला जात नाही
  • माझ्या पक्षातील नेत्यांनीच माझ्यावर टीका केली म्हणाले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com