चीनच्या ताब्यातील जमीन परत मिळवणार ते मोफत वीज अन् उपचार; केजरीवालांच्या देशवासीयांना 10 गॅरंटी

Arvind Kejriwal 10 Guarantees : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशवासीयांना १० गॅरंटी दिल्या आहेत.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटी समोर केजरीवालांच्या गॅरेंटी ठेवल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देशवासीयांना १० गॅरंटी दिल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर या गॅरंटी पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले आहेत. त्यांनी नेमक्या कोणत्या गॅरंटी दिल्यात ते पाहूया.

केजरीवाल यांच्या १० गॅरंटी

१. देशातील जनतेला मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल. याअंतर्गत गरिबांना २०० यूनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. यासाठी १.२५ लाख कोटी रुपये खर्च होतील

२. देशातील प्रत्येक नागरिकावर मोफत उपचार केले जातील. सरकारी हॉस्पिटलची स्थिती सुधारण्यात येईल

३. अग्निवीर योजना बंद केली जाईल आणि अग्निवीरांना कायमस्वरुपी नोकरी दिली जाईल

४. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल

५. एका वर्षामध्ये २ कोटी रोजगार उपलब्ध करून दिले जातील.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal: चोरांचा पक्ष ते मंगळसूत्रा पर्यंत... अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

६. भाजपच्या वॉशिंगमशीनला चौकात फोडलं जाईल. देशाला भ्रष्टाचार मुक्त केलं जाईल.

७. जीएसटीचे सुलभीकरण केले जाईल. अशी सुविधा केली जाईल जिथे व्यापारी मोकळेपणाने व्यापार करु शकतील

८. सरकारी शाळेमध्ये खासगी शाळांपेक्षा चांगलं शिक्षण दिलं जाईल. यासाठी ५ लाख कोटी रुपये लागतील. यासाठी राज्य सरकार अर्धे आणि केंद्र सरकार अर्धे पैसे देईल

९ देशाच्या जितक्या जमिनीवर चीनने ताबा मिळवला आहे, ती सर्व जमीन पुन्हा मिळवली जाईल. यासाठी सैन्याला पूर्ण सूट दिली जाईल.

१०. शेतकऱ्यांना त्यांच्या धान्यावर एमएसपीच्या आधारे पूर्ण किंमत दिली जाईल.

Arvind Kejriwal
Sakal Podcast: धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड? ते पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात प्रचार करता आला नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांना सध्या अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांना प्रचार करता येणार आहे. केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com