नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली हा प्रवास आता वेगानं होणार आहे. दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेस हायवेचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा हायवे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल करेल आणि, लाखो लोकांना संधी उपलब्ध करून देईल, असं गडकरी यांनी म्हटलंय.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई ते दिल्ली 13 तासांत
नव्या एक्स्प्रेस हायवेमुळं मुंबई ते दिल्ली अंतर 13 तासांत कापले जाणार आहे. यामुळं दोन शहरांमधील मलाची वाहतूक कमी वेळेत होणार आहे. मुळात राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरांवर देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा आहे. दोन्ही शहराचं महत्त्व लक्षात घेऊनच या एक्स्प्रेस हाय-वेची उभारणी करण्यात येत आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, मुंबई असा या हायवेचा मार्ग असणार आहे. सध्या या हायवेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या हायवेच्या कामाचं भूमीपूजन दिवंगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, तात्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 2019मध्ये झालं होतं. गेल्या वर्षभरात या हायवेचं काम अतिशय वेगानं सुरू आहे.
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवे हा देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणेल. या हायवेमुळं लाखो लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. तुम्ही हरियाणा आणि राजस्थानमधील हायवेच्या कामाची प्रगती पाहू शकता.
- नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळण मंत्री
आनंद महिंद्रांनी केलं स्वागत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ट्विटला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी रिप्लाय देत कामाचं स्वागत केलंय. लहानपणापासून दिल्ली-मुंबई हायवेनं अनेकदा प्रवास केलाय. त्यामुळं या हायवेचं एक्स्प्रेस-वेमध्ये रुपांतर व्हावं, असं खूप आधीपासून वाटंतय, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
कसा असेल एक्सेप्रेस वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.