Why the Modi Government Remains Silent on Toxic Air

Why the Modi Government Remains Silent on Toxic Air

Sakal

Delhi Air Pollution : दिल्लीत प्रदूषण वाढले; लोक श्वास घेण्यासाठी झगडत आहेत; मात्र समस्येवर मोदी सरकारची दातखीळ!

Air Quality Crisis : दिल्लीमध्ये प्रदूषणाचा निर्देशांक भीषण पातळीवर पोहोचला असून लाखो नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या निष्क्रियतेमुळे प्रदूषणावरील उपाययोजना फक्त कागदावरच राहिल्या आहेत.
Published on

दिल्ली : प्रदूषणाच्या समस्येवर मोदी सरकारची दातखीळ बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील व विशेषतः दिल्लीतील या समस्येबाबत चकार शब्दही उच्चारलेला नाही. दिल्लीने जगातील सर्वात प्रदूषित शहर (गॅस चेम्बर) म्हणून बहुमान पटकावला आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकता आदी महानगरे वेगाने प्रदूषणाच्या विळख्यात ओढली जात आहेत. दिल्लीत केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्यपाल व नगरपालिका हे सारे भाजपचे. तोच भाजप दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असताना रात्रंदिवस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फैलावर घ्यायचा, सळो की पळो करून सोडायचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com