नवी दिल्ली : दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला असून, 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं जीटीबी हॉस्पिटलच्या हवाल्याने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ईशान्य दिल्लीतील अनेक भागांत कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केलाय.
हुतात्मा रतन लाला यांच्यावर अंत्यसंस्कार
दिल्लीतील हिंसाचारात हुतात्मा झालेले कॉन्स्टेबल रतन लाल यांच्यावर आज शासकीय इतमामांत अंत्यसंक्कार करण्यात आले. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल आणि पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांनी त्यांना आदरांजली वाहली. काल (सोमवार, 24 फेब्रुवारी) ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात रतन लाल यांचा मृत्यू झाला होता. आज, दिल्ली हिंसाचारातील मृतांची संख्या 10वर पोहोचली आहे. दरम्यान, जखमींना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
काय घडलं दिवसभरात?
माझं दिल्लीतील नागरिकांना विशेषतः ईशान्य दिल्लीतील नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी कायदा हाती घेऊ नये. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही ड्रोनचीही मदत घेत आहोत.
- एमएस रंधवा, प्रवक्ते, दिल्ली पोलिस
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.