देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय - राहुल गांधी

नुपूर शर्मा प्रकरणावरुन राहुल गांधींनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.
राहुल गांधी
राहुल गांधीesakal

नवी दिल्ली : मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानं आखाती देशातून भारतावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. भारतानं माफी मागावी अशी मागणी काही मुस्लिम राष्ट्रांनी केली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. (Divided internally India becomes weak externally says Rahul Gandhi)

राहुल गांधी यासंदर्भात ट्विट केलं असून आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय. भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेनं आपल्याला केवळ एकाकी पाडलेलं नाही, तर जागतिक स्तरावर भारताचं स्थानही खराब केलं आहे"

राहुल गांधी
नोटांवरील गांधीजींची प्रतिमा बदलण्याचा प्रस्ताव नाही - RBI

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील एका डिबेट शोमध्ये बोलताना पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचबरोबर दिल्ली भाजपचे मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनीही अशाच प्रकारच विधान केलं होतं. पण त्यांच्या या विधानावरुन जागतीक स्तरावर मोठं वादंग निर्माण झालं. आखाती देशानं या विधानावर आक्षेप घेत भारताला टार्गेट केलं आणि माफीची मागणी केली. जागतीक स्तरावरुन प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर भाजपनं नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून निलंबित करत त्यांची प्रथमिक सदस्यता रद्द केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन देशभरातही मोठ्या प्रमाणावर टीका होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर सडकून टीकेचा सूर उमटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com