भाजपवर मात करणारा नेता काँग्रेसमध्ये आहे! हा बघा..!

DK Shivkumar
DK Shivkumar

राजकारणात प्रतिस्पर्ध्यावर मात केली जाते, ती रणनीतीच्या जोरावर! काँग्रेसची सुस्तावलेली यंत्रणा भाजपच्या व्यूहरचनेवर मात करू शकत नाही, हे गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये सातत्याने दिसून आले आहे. भाजपच्या यशामागील आणि रणनीतीमागील प्रमुख चेहरा म्हणजे अमित शहा! काँग्रेसकडे अशा आक्रमक नेत्यांची वानवा असल्याने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये त्यांना निवडणुकीत मिळालेले माफक यशही राजकीय ढिलाईमुळे गमवावे लागले होते. पण कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये असे झाले नव्हते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डी. शिवकुमार! 

कर्नाटकमध्ये सध्या सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी बंडखोरी करत राज्य सरकार अस्थिरतेच्या पातळीवर नेले आहे. आता त्यांना पुन्हा काँग्रेसकडे 'वळविण्या'ची जबाबदारी शिवकुमार यांच्याकडेच आली आहे. त्यासाठी शिवकुमार मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि 'माझ्या मित्रांना भेटल्याशिवाय मी माघारी जाणार नाही', असे सांगत त्यांनी कर्नाटकातील सत्तेचा पेच संपविण्याचा निर्धारही केला आहे. 

शिवकुमार हे नाव राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकू लागले ते कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीनंतर.. पण त्याआधीपासूनच शिवकुमार हे काँग्रेसमधील 'स्ट्रॅटेजिस्ट' म्हणून ओळखले जात होते. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करताना भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलामध्ये चढाओढ होती. ती विधानसभा त्रिशंकू होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संख्याबळ कमी असतानाही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केल्यामुळे घोडेबाजारास जोर येणार, हेही नक्की होते. एरवी भाजपची प्रचारयंत्रणा प्रचंड वेगाने काम करते. इतक्‍या वेगाची सवय नसल्यामुळे काँग्रेसला सतत पराभवाची चव चाखावी लागली होती. पण शिवकुमार यांनी सूत्रे हातात घेतली आणि कर्नाटकात हे चित्र पालटण्यात काँग्रेसला यश आले. 

काँग्रेसकडे अशा आक्रमक नेत्यांची वानवा असल्याने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये त्यांना निवडणुकीत मिळालेले माफक यशही राजकीय ढिलाईमुळे गमवावे लागले होते. पण कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये असे झाले नव्हते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डी. शिवकुमार! 

व्यूहरचनेच्या जोरावर पक्षाला सावरण्याची ही शिवकुमार यांची पहिलीच वेळ नव्हती. 2002 मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्यावर विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. त्यावेळी शिवकुमार यांनी पुढाकार घेत काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईहून बंगळूरला हलविले होते. यामुळे काँग्रेसचे आमदार एकत्र ठेवण्यात पक्षाला यश आले होते. त्यावेळी शिवकुमार हे तत्कालीन कर्नाटक सरकारमध्ये मंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे ते विश्‍वासू मंत्री होते. 

गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आमदार फुटण्याची दाट शक्‍यता होती. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अहमद पटेल यांच्या पराभवाची चिन्हे दिसू लागल्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यावेळीही काँग्रेसच्या आमदारांना 'सुरक्षित' ठेवण्याची जबाबदारी शिवकुमार याच्याकडेच होती. गेल्या सिद्धरामय्या सरकारमध्ये उर्जामंत्री असलेल्या शिवकुमार यांनी गुजरात काँग्रेसच्या सर्व आमदारांना एका गोल्फ रिसॉर्टमध्ये एकत्र ठेवले होते. 

व्यूहरचनेच्या जोरावर पक्षाला सावरण्याची ही शिवकुमार यांची पहिलीच वेळ नव्हती. 2002 मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्यावर विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. त्यावेळी शिवकुमार यांनी पुढाकार घेत काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईहून बंगळूरला हलविले होते.

कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेचा दावा करताना काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटत होती. पण शिवकुमार यांनी सर्वांना बंगळूरबाहेर हलवून सकाळी थेट विधानसभेत आणण्याची चोख व्यवस्था केली. इतकेच नव्हे, तर काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला आणण्यासाठी शिवकुमार स्वत: गाडीपर्यंत जात होते आणि त्या आमदाराला विधानसभेत आतपर्यंत सोडत होते. या सर्व आमदारांची 'कस्टडी' शिवकुमार यांच्याकडेच होती. लिंगायत समाजाचे आमदार 'जेडीएस'ऐवजी भाजपला मतदान करतील, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना होती. पण एकही आमदार फुटू न देता शिवकुमार यांनी पुन्हा एकदा 'मास्टर स्ट्रॅटेजिस्ट' म्हणून स्वत:ला सिद्ध करत भाजपला कर्नाटकमधील सत्तेपासून दूर ठेवले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com