

Indian Army
नवी दिल्ली - ‘देशातील जवानांना पहिली सीमारेषेवर आणि दुसरी कायदेशीर हक्कांसाठी न्यायालयात अशा दुहेरी आघाड्यांवर लढाई लढण्यास भाग पाडू नये,’ असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी म्हटले आहे. जवान आणि अधिकाऱ्यांना कायदेशीर प्रश्नात योग्य सहकार्य मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लेह येथे आयोजित कार्यक्रमातील भाषणात ते बोलत होते.