
रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांचा मुलगाच चैतन्य बघेल यांना सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने(ईडी) गुरुवारी अटक करण्यात आली. मद्य गैरव्यवहार प्रकरणात ही अटक करण्यात आली असून, चैतन्य यांनी याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने केला आहे.