ईशान्येकडील सर्वसमावेशक अशा संस्कृतीच्या संरक्षणाची ग्वाही - अमित शहा

गुवाहाटी - विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत करताना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल.
गुवाहाटी - विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत करताना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल.

इटानगर - ईशान्येकडील सर्वसमावेशक अशा संस्कृतीच्या संरक्षणाची ग्वाही देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केंद्र सरकारने ३७० वे कलम रद्द केल्यानंतर ३७१ वे कलमदेखील रद्द केले जाईल, अशी चुकीची माहिती काही जणांनी प्रसारित केल्याचा दावा केला.

राज्यघटनेतील ३७१ व्या कलमातील बहुतांश तरतुदी या ईशान्येकडील राज्यांशी संबंधित असून, या माध्यमातून या राज्यांचा सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक कायदे जपण्यावर भर देण्यात आला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अरुणाचल प्रदेशच्या ३४ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शहा यांनी उपरोक्त मांडले. ते म्हणाले की, ‘‘नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी ईशान्येकडील राज्ये ही केवळ भौगोलिक दृष्टीनेच भारताशी जोडलेली होती. या राज्यांचे उर्वरित देशांसोबत भावनिक एकीकरण करण्याचे काम हे मोदींच्या कार्यकाळात झाले.

आताही ३७१ व्या कलमाबाबत चुकीची माहिती दिली जात असून, हे कलम कधीच रद्द केले जाणार नाही.’’ ईशान्येकडील दहशतवादी कारवाया, राज्य सीमावादाचा संदर्भ देताना शहा यांनी केंद्र सरकार हे या संदर्भात झालेल्या करारांशी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा दावा केला.

आम्ही २०२४ मध्ये जेव्हा येथे मते मागण्यासाठी येऊ, तेव्हा येथील दहशतवाद आणि राज्यांच्या सीमावादाच्या समस्या संपुष्टात आलेल्या असतील.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com