चंडीगड : संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने आयोजित केलेल्या ‘रेल रोको’मुळे पंजाब, हरियानामधील अनेक ठिकाणी रेल्व वाहतूक ठप्प झाली. किमान आधारभूत किमतीला कायद्याचे पाठबळ यासह केलेल्या विविध मागण्यांना केंद्र सरकारने अद्याप मान्यता न दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांनी पंजाबमधील ६२ ठिकाणांसह हरियाना आणि राजस्थानमध्येही दुपारी बारा ते चार या वेळेत रेल्वे वाहतूक रोखून ठेवली. अमृतसर, लुधियानासह पंजाबमधील २२ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वेगाड्यांना विलंब होऊन त्यांचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. हरियाना आणि राजस्थानमध्येही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रेल्वेगाड्या अडवून धरल्या. या दोन्ही राज्यांमध्ये पोलिसांनी काही शेतकऱ्यांना काही काळ ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलनादरम्यान कोठेही हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत.
पंजाब आणि हरियानामधील शंभू सीमेवर सुरू असलेले आंदोलन कायम असून आज येथील शेतकऱ्यांनीही नजीकच्या रेल्वेमार्गावर जात आंदोलन केले. ‘‘रेल्वे अडवून ठेवताना आम्हालाही आनंद होत नाही; मात्र, आमच्या मागण्यांकडे डोळेझाक करणाऱ्या केंद्र सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचविण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत,’’ असे किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सरवानसिंग पंधेर यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.