दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड्स हटवले; पोलिसांनी सांगितले कारण...

Farmers Protest: पोलिसांनी आज सिंघू, टीकरी आणि गाझीपूर सीमांवरील बॅरिकेड्स हटवायला सुरुवात केली.
Delhi
Delhi Team eSakal

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेगवेळ्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिल्लीकडे येणाऱ्या या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी असणारे हे बॅरिकेड्स आणि काटेरी तारा काढायला सुरूवात केली आहे. पोलिसांनी हे बॅरिकेड्स काढल्याने वेगवेळ्या शक्यता वर्तवल्या जात असतानाच आता पोलिसांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे स्थानिक लोकांच्या आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. "शेतकरी नेते, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर, सीमेवरी बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, एक सकारात्मक संदेश देणं हीच यामागची भूमिका असल्याचं दिल्ली पोलिसांनी केला आहे.

Delhi
"आता बॅरिकेड्स हटवले, लवकरच तीनही कृषी कायदेही हटवले जातील"

सुप्रीम कोर्टाने सुनावणीत शेतकरी संघटनांनी शहराच्या सीमेवर नाकाबंदीसाठी पोलिस जबाबदार असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांकडून हे बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. भारतीय किसान युनियन (BKU) च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी नाही तर पोलिसांनी रस्ते अडवले होते. हजारो शेतकरी 26 नोव्हेंबर 2020 पासून केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी टिकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांवर तळ ठोकून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com