Rajnath Singh: ‘गगनयान’ हा आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील महत्त्वाचा अध्याय: संरक्षण मंत्री राजनाथसिंह; भारताचे अवकाश संशोधन राष्ट्रीय आकांक्षांचे प्रतिबिंब

Atmanirbhar Bharat through space: अवकाश हे केवळ संशोधनाचे क्षेत्र म्हणून नव्हे तर, भविष्यातील नवे आर्थिक क्षेत्र, संरक्षण, ऊर्जा आणि मानवी उपयोग अशा विविध दृष्टीने अवकाश क्षेत्राकडे आपण पाहत आहोत, असे सिंह यांनी सांगितले. भारत सातत्याने पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात झेपावत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
Rajnath Singh: Gaganyaan Marks a Key Chapter in Atmanirbhar Bharat
Rajnath Singh: Gaganyaan Marks a Key Chapter in Atmanirbhar BharatSakal
Updated on

नवी दिल्ली: ‘‘आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात ‘गगनयान’ मोहीम ही एक महत्त्वाचा अध्याय आहे. या मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे शुभांशू शुक्ला आणि या मोहिमेत निवड झालेले अन्य तिघे अंतराळवीर हे देशासाठी मौल्यवान हिऱ्यांप्रमाणे असून ते राष्ट्रीय आकांक्षांची पूर्तता करणारे आहेत,’’ असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले. येथील सुब्रतो पार्क येथे हवाई दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गगनयानसाठी निवड करण्यात आलेल्या चार गगनयात्रींचा विशेष सत्कार करण्यात आला. ॲक्सिओम-४ मोहिमेतील शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी सहभागाबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com