देशात 2.60 लाख लसवंतांना कोरोना

केंद्र सरकारनेच दिली आकडेवारी
Corona Test
Corona Testsakal

नवी दिल्ली : लस (vaccine) घेतल्यानंतरही कोरोनाचा (corona) संसर्ग होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारनेच त्याची आकडेवारी दिली आहे. यात प्रामुख्याने पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना (corona) संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. पण प्रत्येकालाच संसर्ग झालेला नाही. प्राथमिक अहवालानुसार देशात आतापर्यंत २.६० लाख नागरिकांना संसर्ग झाला आहे.

लसीनंतरच्या संसर्गाविषयी माहिती गोळा करण्यासाठी सरकार स्वतंत्र तपशील जमा करीत असून, त्याचे विश्‍लेषण होईल. संसर्गाची बहुतेक प्रकरणे पहिल्या डोसनंतर नोंदवली गेली आहेत. लसीकरणाशी या आकडेवारीची तुलना केल्यास लस घेतल्यानंतर केवळ ०.०४ टक्के लोक संसर्गाने ग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत २ लाख ५८ हजार ५६० लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसात देशात संक्रमित (ब्रेक थ्रू इन्फेक्शन्स) रुग्णांची संख्या समोर आली आहे.

Corona Test
पुणे : मोदींची मूर्ती हटवली; देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत एक लाख ७१ हजार ५११ लोकांना पहिला डोस मिळाल्यानंतर कोरोना झाला, तर दुसरा डोस घेतल्यानंतर ८७ हजार ४९ लोक संसर्गाच्या विळख्यात आले. भारतात हे ब्रेक थ्रू इन्फेक्शनची प्रकरणे डेल्टामुळे वाढत आहेत. यामुळे आजारातील चढउतार दिसत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने काल ५६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.५२ टक्के कायम असून, तो मार्चपासून आजवरच्या सर्वोच्च पातळीवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com