coronavirus: अर्धी लोकसंख्या फेब्रुवारीपर्यंत बाधित; सरकारी समितीचा अंदाज

coronavirus: अर्धी लोकसंख्या फेब्रुवारीपर्यंत बाधित; सरकारी समितीचा अंदाज

नवी दिल्ली -  पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील जवळपास ५० टक्के म्हणजेच १.३ अब्ज लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला असेल असा अंदाज सरकारी समितीने व्यक्त केला आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ७५ लाख एवढी असून अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सप्टेंबरच्या मध्यावधीत कोरोनाच्या संसर्गाने उच्चांक गाठला होता असे सरकारचे म्हणणे आहे. आम्ही तयार केलेल्या गणितीय मॉडेलनुसार सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ३० टक्के एवढी असून फेब्रुवारीपर्यंत ती ५० टक्क्यांच्या घरामध्ये जाईल असा अंदाज आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि सरकारी समितीचे सदस्य मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान हे प्रमाण सरकारने सिरो सर्व्हेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा खूप अधिक आहे. हा अंदाज व्यक्त करणाऱ्या समितीमध्ये विषाणूतज्ञ, वैज्ञानिक आणि काही संशोधकांचा देखील समावेश होता. लोकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर दरमहा कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये २.६ दशलक्ष लोकांची भर पडू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com