![Water Supply](http://media.assettype.com/esakal%2F2024-04%2Fe4a6aaf0-0d8e-4d82-a696-4cc155942585%2FJalgaon_news___2024_04_11T124137_182.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली - ऐन मतदानाच्या तोंडावर हरियाना सरकारने दिल्लीसाठी यमुना नदीतून होणारा पाणी पुरवठा मर्यादित केल्याचा आरोप दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला आहे.
दिल्ली शहराला हरियाना राज्यातून पाण्याचा पुरवठा होतो. यमुना नदीतून हे पाणी दिल्ली सरकारला उपलब्ध करून दिले जाते. गेल्या पाच दिवसांपासून मात्र यमुना नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने दिल्लीतील काही भागात पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते.
साधारणतः पाण्याची पातळी ६७१ फुटाच्या खाली येत नाही. यावेळी पहिल्यांदा या पातळी खाली आहे. हरियानात भाजपचे सरकार असून या सरकारने मुद्दाम दिल्लीत पाण्याचे संकट निर्माण व्हावे, यासाठी हरियाना सरकारने पाणी रोखल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे.
यासंदर्भात दिल्ली सरकारने हरियाना सरकारशी संपर्क साधला असून दिल्लीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा पुरवठा करावा, अशी विनंती केली आहे. ही विनंती मान्य न केल्यास दिल्ली सरकार सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल, असेही आतिशी मार्लेना यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.