India Pakistan Conflict : संपूर्ण रात्र सीमेवर चकमक, भारतीय लष्कराचे जोरदार प्रत्युत्तर; एक जवान हुतात्मा

Border Firing : पूँच ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानने गोळीबार केल्याने एक महाराष्ट्रातील जवान हुतात्मा झाले असून भारताने जोरदार प्रत्युत्तर देत ड्रोन हल्लेही निष्प्रभ केले.
India Pakistan Conflict
India Pakistan Conflict Sakal
Updated on

पूँच : थेट केलेले हल्ले भारताने परतवून लावल्याने पाकिस्तानने गुरुवारी रात्रभर संपूर्ण सीमेवर उखळी तोफांच्या माऱ्यासह जोरदार गोळीबार केला. जम्मू-काश्‍मीरमधील पूँच ते राजस्थानमधील जैसलमेरपर्यंत मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबारात महाराष्ट्रातील एक जवान हुतात्मा झाले. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने आजही जम्मू, सांबा आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये ड्रोन हल्ले केल्याचे आणि हे हल्लेही निष्प्रभ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com