देशद्रोहाचे सर्वात कमी गुन्हे जम्मू काश्मीरमध्ये, कोणत्या राज्यात सर्वाधिक? जाणून घ्या..

गेल्या वर्षी देशभरात ४७५ देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Sedition Charges
Sedition ChargesSakal

देशभरातल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यांची आकडेवारी आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आली आहे. देशभरात २०२१ या वर्षात देशद्रोहाचे ४७५ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यापैकी सर्वाधिक गुन्हे आसाममध्ये नोंदवले गेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

आसाममध्ये २०१४ ते २०२१ या कालावधीत देशातल्या ४७५ गुन्ह्यांपैकी ६९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आसाममध्ये गेल्या ८ वर्षांतल्या गुन्ह्यांची संख्या १४.५२ टक्के आहे. म्हणजेच गेल्या आठ वर्षांमध्ये देशात दाखल झालेला ६ पैकी एक गुन्हा आसाममध्ये दाखल झाला आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या आकडेवारीवरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. २०१४ पासून देशद्रोहाच्या कलम १२४ ए अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संग्रहित माहितीच्या आधारे हे निष्कर्ष समोर आले आहेत. २०२१ साली देशभरात देशद्रोहाचे ७६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०२० मध्ये ७३ गुन्हे दाखल झाले होते. तर त्याहीपेक्षा २०१९ मध्ये जास्त म्हणजे ९३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर सर्वात कमी म्हणजे ३० गुन्हे २०१५ मध्ये नोंदवण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com