Rahul Gandhi : ''लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केलं जाईल'', आसामच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बुधवारी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक केली जाईल.
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal

Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बुधवारी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक केली जाईल.

rahul gandhi in assam

आसामच्या सिबसागर जिल्ह्यातील नाझिरा येथे बुधवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केलेली आहे. एक विशेष तपास पथक तपासणी करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक केली जाईल.

Rahul Gandhi
Maratha Reservation: लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळा, दीपक केसरकरांचे मराठा बांधवांना आवाहन, वक्तव्याचा अर्थ काय?

भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसा भडकावल्याचा आरोप राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलेला आहे. पोलिसांनी स्वतः दखल घेत २३ जानेवारी रोजी एफआयआर दाखल केलेला आहे.

Rahul Gandhi
Maratha Reservation : ''जरांगेंना कोर्टात हजर राहावं लागणार, परवानगी नसलेला मोर्चा थांबवावा लागेल'' सुनावणीनंतर सदावर्ते म्हणाले...

आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंह यांनी सांगितलं की, अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (सीआयडी) हे प्रकरण एसआयटीकडून सीआयडीके वर्ग केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com