Amit Shah : न्यायव्यवस्था आता अधिक न्यायकेंद्रित; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

New Criminal Laws : देशातील तीन नवीन फौजदारी कायदे ही २१व्या शतकातील ऐतिहासिक सुधारणा असून, या कायद्यांमुळे न्यायव्यवस्था शिक्षाकेंद्री न राहता न्यायकेंद्रित होईल आणि सर्वांना वेळेत व सुलभरित्या न्याय मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जयपूरमध्ये केले.
Amit Shah

Amit Shah

Sakal

Updated on

जयपूर : देशात तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी ही २१व्या शतकातील भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेतील सर्वांत मोठी आणि ऐतिहासिक सुधारणा आहे. या कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेला आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्री स्वरूप मिळाले आहे. या कायद्यांमुळे देशाची न्यायव्यवस्था शिक्षाकेंद्री न राहता न्यायकेंद्रित होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. जयपूरमध्ये एका प्रदर्शनाचे उद्‌घाटन केल्यावर ते बोलत होते. जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (जेईसीसी) येथे भरलेल्या प्रदर्शनात भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेतील बदल अधोरेखित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com