नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त असलेल्या मजूरांना गावी पोहोचण्यासाठी अनेक गोष्टींशी संगर्ष करावा लागत आहे. महाराष्ट्रातून मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि गोंधळ झाला. दरम्यान आता ही रेल्वे पुन्हा गोरखपूरला रवना करण्यात आली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या आणि नंतर पायीच घरी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने अखेर त्यांना मूळ गावी जाता यावे म्हणून काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत, यावेळी ही घटना घडली आहे. महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी जाण्यासाठी एक श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर अचानक ओडिशामध्ये पोहोचली. तोपर्यंत रेल्वे मोटरमनला काहीही समजले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला.
-----
पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
-------
भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट
-------
आपला नियोजित मार्ग सोडून ही रेल्वे दुसरीकडे गेलीच कशी असे प्रश्न रेल्वे प्रशासनाला विचारले जात असताना त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आम्ही याबाबत एक चाचपणी केली आणि तो एक नियोजनाचा भाग होता, असे रेल्वे कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मोठ्या प्रवासानंतर आता हे प्रवाशी त्यांच्या निश्चित स्थळी गोरखपूरला पोहोचले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.