
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर ९६ दिवसांनी भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्युत्तरादाखल सुरू केलेल्या ऑपरेशन महादेवमुळे दहशतवाद्यांचा खेळ संपल्याचे सिद्ध झाले आहे. श्रीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत, पहलगाम हल्ल्याशी संबंधित असलेले तीन दहशतवादी मारले गेले. मात्र हे ऑपरेशन महादेव काय होते? ते कसे राबवले गेले आणि दहशतवाद्यांचा खात्मा कसा झाला? हे आता समोर आले आहे.