चीनमधून आतापर्यंत किती भारतीयांची सुटका केली ते वाचा

Corona Virus
Corona Virus

नवी दिल्ली - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या चीनमधून आतापर्यंत साडेसहाशेपेक्षा अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले.

चीन सरकारच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून आज स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले की, ‘‘ आणखी दहा भारतीयांनी चीनमधून मायदेशी परतण्याची इच्छा बोलून दाखविली असून त्यांची स्क्रिनिंग टेस्ट होऊ न शकल्याने ते तेथेच अडकून पडले आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’

दरम्यान चीनमधील वुहानमधून आलेल्या ६४५ भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला नसून त्यांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com